पुराणकथा : (माइथॉलजी). आदिम व प्रगत अशा सर्व धार्मिक समाजांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निश्चितपणे आढळणारी विशिष्ट प्रकारची पवित्र कथा. पुराणकथांमधील विषयांच्या आत्यंतिक विविधतेमुळे त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांचा निर्देश करणारी म्हणजेच सर्वसमावेशक अशी व्याख्या करणे हे जवळजवळ अशक्य आहे परंतु साधारणपणे असे म्हणता येते, की विश्वातील म्हणजे आकाश, अंतरिक्ष व पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, मानव इत्यादिकांच्या जीवनातील घडामोडी कशा झाल्या व होतात किंवा कालचक्र व ऋतुचक्रानुसार विश्वातील विविध पदार्थांच्या नानाविध अवस्था कशा अस्तित्वात आल्या व येतात यासंबंधी, त्याचप्रमाणे निसर्गातील परंतु निसर्गनियंत्रण अशा अलौकिक शक्तींची विविध रूपे, चरित्रे, विग्रह व लीला यांच्यासंबंधी धार्मिक श्रद्धेने केलेले निवेदन म्हणजे पुराणकथा होय. या संदर्भात धर्माची कर्मकांडादी अंगे, यातुक्रिया व तत्संबंधी अलौकिक शक्ती यांचा महिमा वा माहात्म्य सांदितलेले असते हेही पुराणंकथेत अंतर्भूत होते. धर्मनिष्ठ लोकांना पुराणकथा ही श्रद्धेय आणि पवित्र वाटते परंतु वास्तववादी, वैज्ञानिक वा विवेकवादी दृष्टीने पुराणकथा म्हणज...
संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali) अंजली कुलकर्णी 11/04/2015 संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. त्यांच्या पित्याचे नाव परसूबा, आईचे नाव नांगिताबाई. पत्नीचे नाव जनाबाई. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला. संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला
आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय? श्री.गोविंदप्रभू हे गुंडम राऊळ, गुंडम स्वामी या नावानेही प्रख्यात आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांचे गुरू असलेल्या श्री गोविंद प्रभू ची महानुभाव संप्रदायातील 'पंचकृष्ण' संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. श्री. गोविंदप्रभू यांचा जन्म ११८७ मध्ये 'अनंतनायक व नेमाईसा' या काण्वशाखीय ब्राह्मण दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर (रिधपूर) जवळील काटेसूर हे होते. ते लहान असतांनाच त्यांच्या मात्यापित्याचे छत्र हरवले, त्यामुळे त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या मावशीने रिद्धपूर येथे केला. बोपो उपाध्ये यांच्याकडे त्यांनी वेदाध्यन केले. श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरुसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण...
Comments
Post a Comment